टी२० विश्वचषक २०२६ : भारत-न्यूझीलंड अंतिम सामन्यासाठी सज्ज

विदर्भ न्यूज एक्सप्रेस
वृत्तसंस्था / अहमदाबाद : २०२६ च्या टी२० विश्वचषकाचा अंतिम सामना भारत आणि न्यूझीलंड यांच्यात अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणार आहे. क्रिकेटप्रेमींना या सामन्याची आतुरतेने वाट पाहावी लागेल कारण हा सामना इतिहासात पहिल्यांदाच टी२० फायनलमध्ये दोन्ही संघांमध्ये होणार आहे.
सेमीफायनल निकाल -
पहिल्या सेमीफायनलमध्ये न्यूझीलंडने दक्षिण आफ्रिकेला सहज पराभूत केले, तर दुसऱ्या सेमीफायनलमध्ये भारताने इंग्लंडला अटीतटीच्या लढतीत हरवले. या विजयांमुळे दोन्ही संघ फायनलमध्ये आपली जागा निश्चित करू शकले आहेत.
इतिहासात पहिल्यांदाच टी२० फायनलमध्ये सामना -
आयसीसीच्या तिन्ही फॉरमॅटमध्ये भारत आणि न्यूझीलंड अनेक फायनलमध्ये आमनेसामने आले आहेत, परंतु टी२० विश्वचषक फायनलमध्ये याची ही पहिली भेट ठरणार आहे. यापूर्वी दोन्ही संघ एकदिवसीय आणि कसोटी फायनलमध्ये आमनेसामने आलेले आहेत.
गतविजेता भारताची सुवर्णसंधी -
भारताला सलग दुसऱ्यांदा टी२० विश्वचषक जिंकण्याची सुवर्णसंधी आहे. टीम इंडियाने २०२६ स्पर्धेत चांगली कामगिरी केली आहे, परंतु अंतिम सामन्यात न्यूझीलंडला हरवणे हे मोठे आव्हान ठरणार आहे.
न्यूझीलंडची पहिली टी२० विश्वचषक जिंकण्याची अपेक्षा -
टीम इंडियाला टी२० विश्वचषकात न्यूझीलंडविरुद्ध अजून एकही विजय मिळालेला नाही. दोन्ही संघांनी आतापर्यंत तीन टी२० सामन्यांमध्ये सामना केला असून भारताला तीनही वेळा पराभव पत्करावा लागला आहे.
मागोमागचा इतिहास -
२०२१: वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनल, न्यूझीलंडने भारताला ८ विकेट्सने हरवले.
२०२५: आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी (वनडे) फायनल, भारताने न्यूझीलंडला ४ विकेट्सने हरवून तिसरी चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली.
८ मार्चचा सामना इतिहास बदलण्याची सुवर्णसंधी ठरणार असून, दोन्ही संघांना विजयाची तगडी तयारी आहे.
News - World




Petrol Price




